आपला भारत हा लोकशाही प्रधान देश आहे. निवडणूक हा
त्यातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. ह्या निवडणुकीची प्रक्रिया विद्यार्थिनीना
समजावी यासाठी दरवर्षी शालेय मंत्रिमंडळ निवडणूक घेतली जाते. यात शाळेतील सर्व
विद्यार्थिनी मतदान करून आपला प्रतिनिधी निवडतात. निवडून आलेले प्रतिनिधी वर्षभर
शालेय कामकाज, उपक्रमात सहभाग घेतात.